प्रस्तावना:
मानव आणि निसर्ग या दोघांचा भरपूर पूर्ण संबंध आहे. या निसर्गातून मानवाला विविध प्रकारची संसाधने ही प्राप्त होतात. त्या सर्व संसाधनांचा उपयोग मानव आपल्या जीवनामध्ये करतो.
तसेच वृक्ष हा निसर्गाचा सर्वात महत्वाचा हिस्सा आहे. वृक्ष हे आपल्या सर्वनाच्या जीवनामध्ये पाणी आणि आहाराप्रमाणे खूप महत्वाचे आहेत. वृक्षांशिवाय मानव आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही.
वृक्ष हे आपल्या जीवनाचा मूलभूत आधार आहेत. तसेच वृक्ष हे निसर्गाची मानवाला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे.
वृक्षांपासून मिळणाऱ्या गोष्टी
त्याच प्रमाणे वृक्ष मानवाला राहण्यासाठी जागा देतात आणि उन्हाळयात सर्वाना सावली प्रदान करतात. वृक्षांमुळे आजूबाजूचे वातावरण हे सुंदर आणि स्वच्छ राहते.
वृक्षांचा उपयोग
वृक्षांच्या लाकडाचा उपयोग हा ग्रामीण भागात जास्त जास्त प्रमाणात केला जातो. तसेच मानव वृक्षांपासून दरवाजे, खिडक्या आणि विविध प्रकारची लाकडी खेळणी तयार करतो.
प्राणी आणि निसर्ग
काही पक्षी हे वृक्षांवर आपला घरटा बांधून राहतात. मानवा प्रमाणेच प्राणी आणि पक्ष्यानाच्या जीवनामध्ये वृक्षांचे खूप महत्त्व आहे.
वृक्षांपासून फायदे
वृक्ष हे वातावरणाला शुद्ध ठेवण्याचे कार्य करतात.
वृक्षांपासून मानव उद्योगांसाठी लागणारा कच्चा माळ तयार करतो.
तसेच मानव वृक्षांच्या लाकडापासून रबर, माचीस, औषधे इत्यादी अनेक वस्तू तयार करतो.
वृक्ष पाऊस पडण्यास मदत करतात.
त्याच प्रमाणे वृक्ष मातीला घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे मातीची हालचाल होत नाही.
वृक्ष हे जल, वायू, माती आणि ध्वनी इत्यादी प्रदूषणांना रोकण्याचे कार्य करतात.
स्वार्थी मानव
वृक्ष तोडताना मानवच आपल्या स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारून घेत आहे. हे त्याला कळतच नाही आहे. वृक्षांची तोड केल्यामुळे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.
तसेच रस्त्यांवरचे सावली देणारे वृक्ष हे नामशेष होत चालले आहे. परंतु या सर्वाचा सर्वात जास्त परिणाम हा माणसावाच्या जीवनावर होत आहे.
वृक्ष वाचवण्याचे उपाय
सर्व लोकांनी वृक्ष तोडण्याऐवजी जास्तीत – जास्त वृक्ष संवर्धन करणे गरजेचे आहे.
वृक्ष तोडणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे.
जास्त प्रमाणात वृक्ष लावून त्यांचे जतन केले पाहिजे.
तसेच सर्व लोकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना वृक्षांचे महत्त्व “समजावून” सांगितले पाहिजे.
निष्कर्ष:
जर मानव दिवसेंदिवस वृक्षांची तोड करत राहिला तर एक दिवस मानवाच्या जीवनाचा शेवट होईल. याला मुख्य जबाबदार मानव असेल. म्हणून आपण सर्वानी मिळून दरवर्षीं एक तरी झाड लावले पाहिजे.
तसेच आपल्या जीवनातील वृक्षांचे महत्त्व आणि मूल्य पाहून जीवन आणि पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्षांचा सम्मान आणि जतन करणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या देशात २१ मार्चला ‘जागतिक वन दिवस’ म्हणून साजरा केला जातो.