प्रस्तावना:
आमचा भारत देश हा ऋतूंचा देश म्हणून ओळखला जातो. या भारत देशामध्ये ६ ऋतू हे प्रामुख्याने एका मागून एक येतात. भारत देशामध्ये येणाऱ्या प्रत्येक ऋतूचे विशेष महत्त्व आहे.
या सर्व ऋतूंमध्ये वसंत ऋतू हा प्रत्येकाला आवडणारा ऋतू आहे. वसंत ऋतूला ‘ऋतुराज’ असे सुद्धा म्हटले जाते. वसंत ऋतू हा सर्व ‘ऋतूंचा राजा’ म्हणून ओळखला जातो.
वसंत ऋतू म्हणजे –
वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे. निसर्ग हा अन्य ऋतूंमध्ये सुंदर दिसतोच. परंतु या ऋतूचे आगमन होताच निसर्गाचे सौंदर्य अधिक होते. वसंत ऋतूला इंग्रजीमध्ये Spring असे म्हटले जाते.
वसंत ऋतु चे आगमन
वसंत ऋतूची सुरुवात ही मार्च महिन्यापासून सुरु होऊन मी महिन्यापर्यंत असते. हिंदू कॅलेंडरनुसार वसंत ऋतू हा भारत देशात मग व फाल्गुन महिन्यात येतो.
वसंत ऋतू हा सर्व ऋतूंमध्ये सर्वात सुंदर, मोहक आणि आकर्षक असतो. वसंत ऋतूच्या आगमनाने संपूर्ण सृष्टी हि आनंदाने फुलून जाते.
निसर्गाची सुंदरता
वसंत ऋतू हा झाडांना नवीन जीवन देतो. तसेच फुलांसाठी हा हंगाम सर्वात महत्वाचा असतो. मधमाश्या आणि फुलपाखरे फुलांच्या कळ्यांभोवती फिरून त्यातील रस शोषून घेतात आणि मध बनवतात. या ऋतूमध्ये फळांचा राजा असलेला आंबा हे झाड बहरू लागते.
प्रत्येकाला आंबे खाण्याचा उत्साह भरलेला असतो. कोकिळा सुद्धा आपल्या मधुर आवाजात गोड गाणे गाते. वसंत ऋतूमध्ये थंड हवा सतत फिरत असते आणि वातावरण सुद्धा चांगले असते.
ऋतूंचा राजा
वसंत ऋतूचे वैभव हे अनन्य आहे. वसंत ऋतूला सर्व ऋतूंमध्ये सर्वात महत्वाचे स्थान आहे. भारत देशाची ख्याती हे नैसर्गिक सौंदर्य आहे.
या धरतीवर राहणारी सर्व माणसे स्वतःला धान्य मानतात. कारण वसंत ऋतूच्या सुरुवातीस तापमान सामान्य स्थितीत असते. ज्यामुळे लोकांना आराम मिळतो.
या ऋतूमध्ये फुलांच्या काळ्या या जोमाने फुलतात आणि चांगल्या स्मित हास्याने या निसर्गाचे स्वागत करतात. झाडांवर येणारा फुलांचा मोहर हा अतिशय सुंदर देखावा असतो. त्यामुळे संपूर्ण वातावरणात सुंगंध पसरतो.
वसंत ऋतूचे स्वागत
वसंत ऋतूच्या आगमनामुळे नवीन पिके पिकण्यास सुरुवात होते. मोहरीची पिवळी फुले उमलतात आणि डोके वर करून आपला आनंद व्यक्त करतात. त्याच बरोबर कमळाची फुले अशा प्रकारे पाण्यात उमलतात की, आपले मन मोकळे करतात.
तसेच आपल्या मनातली सर्व दुःख झाकून ठेवतात. त्याच प्रमाणे आकाशाचे पक्षी वसंत ऋतूला छडी मारून त्याचे स्वागत करतात.
वसंत पंचमी
जेव्हा वसंत ऋतूचे आगमन होते तेव्हा वसंत पंचमी साजरी केली जाते. वसंत पंचमीच्या दिवशी हलवा आणि केशराची खीर बनवली जाते.
या दिवशी लोक पिवळे वस्त्र धारण करतात. तसेच मुले सुद्धा पिवळ्या रंगाचे पतंग उडवतात. वसंत पंचमी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते.
वसंत ऋतूचा इतिहास
विद्येची प्रमुख देवता असलेल्या देवी सरस्वती यांचा जन्म वसंत पंचमीच्या दिवशी झाला होता. या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते.
तसेच वीर हकीकत राय यांचे निधन सुद्धा याच दिवशी झाले होते म्हणून या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढले होते.
निष्कर्ष:
निसर्ग हा काही बोलत जरी नसला तरी आपले कितीतरी भाव प्रकट करत असतो. म्हणून आपण सर्वांनी प्रत्येक ऋतूचा आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेतला पाहिजे. वसंत ऋतू हा आपल्या आरोग्यसाठी सर्वात सुंदर ऋतू आहे.
वसंत ऋतू हा खूपच प्रभावी ऋतू आहे. हा ऋतू उत्साह, उमंग आणि उल्लाहसाचा ऋतू आहे. अनेक कवींनी आपल्या कवितांमध्ये वसंत ऋतूचे अत्यंत सुंदर प्रकारे वर्णन केले आहे.