प्रस्तावना:
आमचा भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. हा गावा – गावांचा देश आहे. या भारत देशातील बहुतेक लोक खेड्यात राहतात. तसेच शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. शेती हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे.
म्हणून शेतकरी हा संपूर्ण जगाचा पोशिंदा असतो. जर या शेतकऱ्याने आपल्या शेतात काही उगवलं नाही तर आपण सर्वाना आपले जीवन जगणे खूप कठीण होईल.
शेतकरी म्हणजे काय –
शेतीचा विकास
भारत देशातील ग्रामीण भागातील लक्ष हे जास्तीत – जास्त शेती हा व्यवसाय करतात. भारत देशात प्राचीन काळापासून सखोल भागात शेती केली जाते.
शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी
शेतकऱयाला शेती करण्यासाठी मुख्यतः तीन गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे सुपीक जमीन त्यानंतर पाणी आणि तिसरी गोष्ट म्हणजे मनुष्यबळ.
जर शती करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी असेल तरच शेतकरी शेती करू शकतात. शेतकऱ्याला शेती करताना येणार खर्च पूर्ण करण्यासाठी पैसे लागतो. त्यानंतर तो शेवटी आपला उत्पादित केलेला शेतमाल बाजार पेठेत नेऊन विकतो.
शेतकऱ्यांसाठी शेती हिच सर्व काही असते. त्याच्या कुटुंबाचा उदार निर्वाह हा शेतीवर अवलंबून असतो. तसेच जगातील अनेक उद्योग करणारे लोक हे काळात – नकळत शेतीवर अवलंबून असतात.
शेतकऱ्यांचे मित्र
काही पक्षी हे शेतातली धान्य खातात. तर काही पक्षी हे शेतीला नुकसान करणाऱ्या कीटक आणि किड्याना खातात. पक्षी पिकाची काढणी झाल्यानंतर जमिनीवर पडलेले दाणे टिपतात.
शेतकऱ्यांवर येणारी संकटे
तसेच हवामानात होणाऱ्या अचानक बदलांमुळे शेतीचे फार नुकसान होते. शेतकरी हा हजारो रुपये खर्च करून शेतमाल गोळा करतो तसेच त्याची काळजी घेतो. परंतु शेवटी त्याच्या पदरात किंवा कष्टाला फळ मिळतच असे नाही.
जय जवान, जय किसान नारा
आपल्या देशासाठी आणि मातृभूमीसाठी अन्न धान्य पिकवणारा तसेच धरतीला सुजलाम – सुफलाम बनवणारा शेतकरी हा स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि देशातील लोकांना अन्न धान्य पुरविण्यासाठी रात्रंदिवस शेतात राबत असतो.
निष्कर्ष:
शेतकरी हा खरोखरच या जगाचा पोशिंदा आहे. तसेच शेतकऱ्याप्रमाणेच आपल्या मातृभूमीला सुजलाम – सुफलाम बनविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावले पाहिजे.
कारण त्यापासून प्रदूषण रोखण्यास मदत होईल आणि जमिनीची धूप सुद्धा होणार नाही. त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न आणि सहकार्य केले पाहिजे.