पानी का जीवन में आयुर्वेदिक महत्व 1

पाणी वाचवा मराठी निबंध – वाचा येथे Essay on Save Water in Marathi Language

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

पृथ्वी हा एक असा ग्रह आहे जानवर मानवाला आपले जीवन जगण्यासाठी विविध संसाधने उपलब्ध आहेत. तसेच इतर कोणत्याही ग्रहांवर जीवन शक्य नाही. कारण ते नापीक वाळवंटाप्रमाणे आहेत आणि तिथे पाणी मिळत नाही.

पाण्याशिवाय कोणताही व्यक्ती आपल्या जीवनाची कल्पना करु शकत नाही. कारण मानवाचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे. पाणी हे जीवनातील सर्वात महत्वाचे अनमोल रत्न आहे.

पाणी हे मानवाला निसर्गाकडून मिळालेली एक अनमोल भेटवस्तू आहे. मानव काही दिवस अन्ना शिवाय राहू शकतो. परंतु मानव आपले जीवन पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाण्याचा एक – एक थेंब महत्वाचा आहे. म्हणून म्हटले गेले आहे कि, पाणी हेच जीवन आहे.

पाण्याची बचत म्हणजे –

Waterfalls पाण्याची बचत म्हणजे कोणत्याही प्रकारे पाणी वाचवणे. पृथ्वीचा ७१ % भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. या धरतीवर १% पाणी हे पिण्यायोग्य आहे. तरीपण काही लोक हे पाणी वाया घालवतात. परंतु आपल्या सर्वाना जास्तीत – जास्त पाण्याची बचत केली पाहिजे.

खार पाणी आणि गोड पाणी

Rainwater आपल्या धरतीवर दोन प्रकारचे पाणी उपलब्ध आहे. ते म्हणजे एक खार पाणी आणि दुसरं म्हणजे गोड पाणी. मानव गोड पाण्याच्या उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. तसेच खाऱ्या पाण्याच्या उपयोग जास्त प्रमाणात केला जात नाही.

पाण्याचा उपयोग

Save Water मानव स्वच्छ आणि गोड पाण्याचा उपयोग जेवण बनवण्यासाठी, कपडे आणि भांडी धुण्यासाठी तसेच साफ – सफाई करण्यासाठी करतो. हि सर्व कामे करत असताना मानव पाणी जास्त प्रमाणात वाया घालवतो. तसेच मानव पाण्याचा उपयोग आग विझवण्यासाठी आणि होळी हा सण खेळण्यासाठी करतो.

प्राणी आणि वनस्पतींना आवश्यक

envaraiment या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला, मानवाला, पक्ष्यांना, प्राण्यांना आणि झाडांना पाण्याची गरज असते. तसेच पाण्यापासून वीज निर्मिती केली जाते. कारण कोणताही प्राणी आणि पक्षी हा पाण्याशिवाय जगू शकत नाही. तसेच झाडे आणि वनस्पती ही आपल्या मुळांमधून जमिनीतील पाणी शोषून घेतात आणि प्रत्येक फांदीपर्यंत पोहचवतात.

लोकसंख्येचे प्रमाण

आज जसजशी लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. त्याच प्रमाणे पाण्याची गरज देखील वाढत आहे. त्याचा जल चक्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. जगातील सांडपाण्याचे प्रमाण सुद्धा वाढत आहे.

निसर्गाने दिलेली मौल्यवान वस्तू

gold पाणी हे निसर्गाने दिलेली एक अमूल्य भेट आहे. ज्याचे मूल्य देणे फार अवघड आहे. पाण्याशिवाय मानवाच्या जीवनाला महत्त्व आणि अस्तित्व नाही. ते जीवन मग प्राण्याचे असो किंवा मानवाचे.

परंतु आज आधुनिक युगात मानवाच्या दुर्लक्षामुळे धरतीवर पाण्याची कमतरता भासू लागली आहे. तसेच काही क्षेत्रे हि दुष्काळग्रस्त आहेत आणि त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही आहे.

पाण्याची बचत कशी करायची –

save water नेहमी पाण्याची बचत कशी करायचे हे खालीलप्रमाणे:

लोकांनी आपल्या बागांना आणि झाडांना गरज असल्यास पाणी देणे. पाईपने पाणी देण्यापेक्षा ते शिंपडणे अधिक चांगले होईल.

तसेच दुष्काळ प्रतिरोधक वनसंपत्ती लावणे हे पाणी वाचवण्याचा सर्वात चांगला उपाय आहे.

पाण्याची गळती थांबविण्यासाठी पाईप लाईन आणि नाळ हे योग्य प्रकारे जोडले आहेत कि नाही याची दक्षता देणे.

गाडी धुण्यासाठी पाईप ऐवजी बादलीचा वापर करावा.

आपण खुल्या नळाऐवजी एका भांड्यात पाणी घेऊन भाजी आणि फळे धुवावीत.

निष्कर्ष:

पाणी हे आपल्या जीवनाचा आधार आहे. पाण्याची बचत करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. तसेच पावसाचे पाणी हे आपल्याला बंधारा बांधून किंवा टाकीत एकत्र साठवून ठेवले पाहिजे. कारण पाणी हे अमृत आहे आणि पाणी हेच जीवन आहे.

मराठीतील पाणी वाचवा निबंध संदर्भात इतर कोणत्याही प्रश्नांसाठी आपण खाली तुमची प्रतिक्रिया देऊन आम्हाला विचारू शकता.

Leave a Comment