रक्षाबंधन

रक्षाबंधन मराठी निबंध – वाचा येथे Essay on Raksha Bandhan in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आपल्या भारतीय संस्कृतीत सणांना फार महत्व आहे. रक्षाबंधन हा भारत देशातील प्रमुख उत्सवांपैकी एक प्रमुख हिंदू धर्माचा सण आहे.

रक्षाबंधन या सणाला ‘राखी’ असे सुद्धा म्हटले जाते. हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. तसेच संपूर्ण देशभरात रक्षाबंधन या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

भारत देशातील विविध भागात सुद्धा हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. रक्षाबंधन हा भाऊ – बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण आहे.

रक्षाबंधन केव्हा साजरा केला जातो –

Rakshabandhan संपूर्ण देशभरात रक्षाबंधन हा सण हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यात येतो. तसेच हा सण ऑगस्ट महिन्यात साजरा केला जातो. श्रावणाचा संपूर्ण महिना हा पवित्र मानला जातो.

रक्षाबंधन हा सण भाऊ – बहिणीच्या प्रेम आणि कर्तव्यासाठी समर्पित आहे. हा सण केवळ भारतातच नव्हे तर नेपाळ आणि मॉरिशस मध्ये सुद्धा साजरा केला जातो.

रक्षाबंधन हा सण कसा साजरा केला जातो –

Raksha Bandhan 1 रक्षाबंधन या पवित्र सणाच्या दिवशी भाऊ – बहीण नवीन कपडे घालतात. बहीण आपल्या भावांच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावतात आणि त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधतात.

तसेच त्यांना मिठाई खायला देतात आणि त्यांना ओवाळतात. बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. त्यानंतर भाऊ आपल्या बहिणींना उपहार म्हणून काही भेटवस्तू देतात. तसेच त्यांना कोणत्याही परिस्थितीत त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतात.

भाऊ – बहीण यामधील प्रेम

raksha bandhan रक्षाबंधन हा सण भाऊ – बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. हा सण भाऊ – बहिणीमधील प्रेम वाढवतो. या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधताना भावाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते.

रक्षाबंधन हा सण अनेक रूपांमध्ये दिसून येतो. काही ठिकाणी बहीणच आपल्या बहिणीला राखी बांधताना दिसून येते.

रक्षाबंधनाचे महत्व

Rakshabandhan रक्षाबंधनाच्या दिवशी ज्यांना – ज्यांना राखी बांधली जाते ते सर्व आपले भाऊच असले पाहिजे असे नाही. बहीण कोणालाही राखी बंधू शकते. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधणे हि एक जुनी परंपरा आहे.

यादिवशी सर्व भाऊ आणि बहिणी एकमेकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारतात. तसेच जैन धर्मामध्ये राखीला खूप महत्त्व आहे.

रक्षाबंधनाचे ऐतिहासिक महत्त्व

रक्षाबंधन त्यौहाररक्षाबंधन या सणामागे काही ऐतिहासिक महत्त्व आहे. प्राचीन कथांवरून असे स्पष्ट होते कि, रक्षाबंधन हा सण केवळ आपल्या भावंडांमध्येच साजरा केला जात नाही तर चुलत भावांमध्ये सुद्धा साजरा केला जाऊ शकतो.

इंद्रदेवाची कथा

रक्षाबंधनाप्राचीन काली इंद्र देवाने असुरराज बली यांच्याशी युद्ध केले होते. या युद्धात इंद्रदेवाचा पराभव झाला होता. इंद्र देवाच्या पत्नीने भगवान विष्णूकडे आपली चिंता व्यक्त केली.

त्यांनी तिला एक पवित्र धागा दिला आणि इंद्र देवाच्या मनगटावर बांधण्यास सांगितले. यामुळे इंद्र देवाचा आत्मविश्वास वाढला आणि दानवांवर विजय प्राप्त केला.

कृष्ण “आणि” द्रौपदी का पवित्र बंधन

तसेच महाभारतात श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदीने आपली साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली. त्यापासून श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचा संकल्प केला.

निष्कर्ष:

रक्षाबंधन हा सण आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख बनला आहे. रक्षाबंधन हा सण म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे तसेच भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे.

त्याच बरोबर रक्षाबंधन हा सण बहीण – भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर झरा आहे. म्हणून या सणाला विशेष महत्त्व आहे. रक्षाबंधन हा सण आपल्या जीवनात बहिणींचे महत्त्व आठवते.

मराठीवरील रक्षाबंधन निबंधासंबंधी इतर कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही तुमची प्रतिक्रिया खाली देऊन आम्हाला विचारू शकता.

Leave a Comment