प्रस्तावना:
पृथ्वी हा एक सर्वात सुंदर ग्रह आहे. ही पृथ्वी खूपच सुंदर आणि हिरवीगार पालवीसह आकर्षक आहे. या सुंदर ग्रहावर आपण सर्व राहतो. कारण पृथ्वीवर प्रत्येक सजीवाला आणि मानवाला आपले जीवन जगण्यासाठी विविध संसाधने उपलब्ध आहेत.
वाचे येथै निसर्ग मराठी निबंध – वाचा येथे Marathi Essay on Nature
ईश्वराने या निसर्गाची खूप अत्यंत चांगल्या प्रकारे निर्मिती केली आहे. म्हणून निसर्ग ही मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. निसर्ग हा मानवाचा चांगलाच साथीगर आहे.
निसर्गाकडून मिळणाऱ्या गोष्टी
हा निसर्ग खूप सुंदर आहे ज्यामध्ये अशा अनेक महत्वपूर्ण शक्ती आहेत. ज्या आपल्याला आनंदी आणि निरोगी जीवन देतात. म्हणून देवाने दिलेली ही सर्वात सुंदर भेट आहे.
मानवाच्या जीवनात महत्त्व
वाचे येथै निसर्ग माझा मित्र मराठी निबंध – वाचा येथे Nature My Friend Essay in Marathi
मानव या निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळून प्रगत होऊ लागला. त्याने पूर्वीच्या काळी हत्यारे बनवली, आग पेटवली आणि चाकाचा शोध लावला. या सर्व शोधांमुळे मानवाचे जीवन संपूर्णपणे बदलून गेले.
मानव दगडाच्या साहाय्याने शिकार करू लागला आणि आगीच्या साहाय्याने शिजवून खाऊ लागला. त्याने चाकाचा शोध लावल्यामुळे चाकाच्या साहाय्याने अन्य ठिकाणी वेगाने पोचू लागला. हे सर्व मानवाला या निसर्गाकडूनच मिळाले.
निसर्गाचे महत्त्व
हजारो वर्षांच्या प्रगतीनंतर मानवाचे जीवन सुधारू लागले आहे. मनुष्य उंच – उंच इमारती आणि रस्ते बांधू लागला आहे. तसेच विमाने आणि शास्त्रे तयार करू लागला आहे. आज मनुष्य मोठं – मोठी स्वप्ने पाहू लागला आहे. तो मूलभूत गरज भागवू लागल्या आहेत. आज मानव भौतिक सुखांच्या मागे पळत आहे.
या निसर्गाने मानवाला खूप काही दिले आहे परंतु त्या बदल्यात मानवाकडून काहीच मागितले नाही आहे. परंतु आज मानव नेहमीच त्याचा नाश करण्यात गुंतलेला आहे.
निसर्गाला नुकसान
मानव आज आपला स्वार्थ आणि सुख – सुविधा पूर्ण करण्यासाठी या निसर्गाचे संतुलन बिघडवत आहे. निसर्गात असणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करत आहे. त्यामुळे सर्व जंगले आणि वने संपुष्ट चालली आहेत.
वाचे येथै :निसर्ग माझा मित्र मराठी निबंध – वाचा येथे Nisarg Maza Mitra Essay in Marathi
झाडांची तोड केल्यामुळे प्रदूषण, ग्रीन हाऊस, ग्लोबल वॉर्मिंग यासारखी समस्या निर्माण होत आहे. तसेच मानवाने तंत्रज्ञानाच्या युगात बरेच शोध लावले आहेत. परंतु या सर्वाचा निसर्गावर सर्वात जास्त परिणाम होत आहे. म्हणून मानवाने निसर्गाचे संरक्षण करणे गरजेचे आहे.
निसर्ग संवर्धन
अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण निसर्गाचे रक्षण करू शकतो.
आपण सर्वानी आपल्या सभोवतालचे निसर्ग स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
तसेच सर्व प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.
मानवाने आपल्या स्वार्थासाठी कधीही निसर्गाचा समतोल बिघडू नये. कारण मानवाच्या जीवनाचे हे सर्वात मोठे कारण बनू शकते.
आपण सर्वानी निसर्गाच्या देणगीचा आदर केला पाहिजे. तसेच निसर्गाच्या नियमांनुसार उपयोग केला पाहिजे.
निष्कर्ष:
निसर्गाने या मानव जातील जन्म दिला आहे. म्हणून त्याचे आपण संगोपन केले पाहिजे. तसेच निसर्गाचे संतुलन राखणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. म्हणूनच निसर्ग हा आपला मित्र, सोबती आणि सखा सुद्धा आहे.