प्रस्तावना:
आमचा भारत देश हा महान नेत्यांचा देश मानला जातो. या देशामध्ये बरेच काही महान नेता होऊन गेले. त्यापैकी एक आहेत – डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. कलाम यांनी वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक आणि भारत देशाचे राष्ट्रपती इ. सर्व पदावर कार्य केले.
त्यांनी इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य केले म्हणून ते सर्व लोकांचे राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध झाले. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती पदाच्या ५ वर्षाच्या काळात भारतीय लोकांच्या मनामध्ये मानाचे स्थान मिळवले.
जन्म–
त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून नेण्याचे – आणण्याचे काम करत होते. परंतु लहान वयातच वडिलांचे छत्र हरपले. त्यावेळी त्यांनी वर्तमान पत्रे विकून आणि लहान – मोठी काम करून घरी हातभार लावला. त्यांचे बालपण कठीण प्रसंगातून गेले.
शिक्षण
कलाम यांनी भौतिक शास्त्रात बी. एस्सी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी चेन्नई मधील इंस्टीट्यूट ऑफ टेकनोलोजि मध्ये प्रवेश घेतला. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना भारतीय हवाई दलात लढाऊ विमानाचे वैमानिक होण्याचे स्वपन होते.
कलाम यांचे कार्य
तेव्हा पासून त्यांनी स्वदेशात सुद्धा क्षेपणास्त्र बनवण्याचा ध्यास घेतला. क्षेपणास्त्र विकास कार्यामधील अग्नी क्षेपणास्त्रच्या यशस्वी चाचणीमुळे कलाम यांचे संपूर्ण जगभरात कौतुक झाले. कलाम यांना स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र तयार करण्याची जिद्द तेव्हापासून होती..
राष्ट्रपती पदावर कार्य
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना १० जून, २००२ मध्ये राष्ट्रपती पदासाठी यांचे नाव सुचवण्यात आले. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यामुळे ते भारत देशाचे राष्ट्रपती बनले. ते देशाचे ११ वे राष्ट्रपती होते आणि त्यांनी हे पद २५ जुलै, २००२ पासून २५ जुलै २००७ पर्यंत निभावले.
पुरस्कार
स्विझर्लंडने हि त्यांच्या वैज्ञानिक कामगिरीची दाखल घेऊन ज्या दिवशी त्यांनी स्विझर्लंडला भेट दिली तो दिवस ‘विज्ञान दिवसच्या‘ रूपाने साजरा केला जातो.
निष्कर्ष:
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी देशाला अवकाश क्षेत्रात पुढे नेणारे तसेच मिसाईल आणि क्षेपणास्त्र स्वयं बनवणारे, देशाच्या तरुणांना – युवकांना देशकार्यासाठी जोडणारे, विद्यार्थ्यांमध्ये रमणारे त्यांना मार्ग दाखवणारे कलाम चाचा होते. डॉ कलाम हे देशाच्या युवकांसाठी सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे.