लोकमान्य टिळक मराठी निबंध – वाचा येथै Essay on Lokmanya Tilak in Marathi Language

प्रस्तावना:

आमच्या भारत देशाला आजादी मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. त्यापैकी बाळ गंधाधर टिळक हे स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक मानले जातात.

ते आपल्या विचारधारा, धैर्य, बुद्धिमत्ता आणि अतूट देशभक्तीची ओळखले जातात. लोकमान्य टिळक यांनी सर्व लोकांना एक्य आणि संघर्षाचा धडा शिकवला. लोकमान्य टिळक हे एक केवळ स्वातंत्र्य सैनिकच नव्हते तर शिक्षक, समाज सुधारक आणि वकील सुद्धा होते.

लोकमान्य टिळकांचा जन्म

Lokmanya Tilak ‘स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळावरणाचं’ असे ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै, १८५६ साली रत्नागिरी जिल्ह्यातील ‘चिखली’ या गावी झाला.

त्यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्याच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक आणि आईचे पार्वतीबाई असे होते. त्यांना सर्वजण ‘बाळ’ ना नावाने पुकारत असत.

लोकमान्य टिळकांचे शिक्षण

LOKMANY TILAK लोकमान्य टिळक हे लहान पणापासून खूप हुशार आणि गणित हा त्यांचा आवडता विषय होता. त्यांच्या कुशाग्र बुद्धीमुळे त्यांचे शिक्षक त्यांना ‘सूर्याचे पिल्लू’ असे म्हणत असत. लोकमान्य टिळकांना मराठी, संस्कृत आणि गणित या विषयांचे ज्ञान होते.

त्यांनी सन १८७३ मध्ये डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी सन १८७७ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून बी. ए ची पदवी मिळवली. त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी एल. एल बी च्या शाखेची निवड केली.

राजकीय जीवन

lokmanya tilak लोकमान्य टिळक, आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सन १८८० मध्ये पुण्याला ‘न्यू इंग्लिश स्कुल’ ची स्थापना केली. सन १८८५ मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेज चालू केले. लोकमान्य टिळकांनी आगरकरांच्या मदतीने ‘केसरी’ व ‘मराठा’ हि दोन वृत्तपत्रे सुरु केली.

त्याच प्रमाणे त्यांनी सर्व लोकांना एकत्र आणून त्या मनामध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण करण्यासाठी सार्वजनिक ‘गणेश उत्सव’ आणि ‘शिव जयंती’ हे दोन उत्सव सुरु केले. त्यांच्या नेतृत्वाखाली शिव जयंती हा उत्सव सर्वात पहिला सन १८९६ मध्ये रायगडावर झाला.

प्लेगची साथ

bal tilak सन १८९७ साली महाराष्ट्रात प्लेगची साथ पसरली होती. तेव्हा रँड सरकारने सर्व लोकांची निर्जंतुकीकरणाखाली अत्यंत छळवणूक केली होती.

रँड व त्याचे सहकारी यांच्या हत्येनंतर पुण्यामध्ये कर्फ्यू लावण्यात आला होता आणि संशयितांची धरपकड केली जात होती. म्हणून लोकमान्य टिळकांनी केसरी या वृत्तपत्रातून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असे विचारले.

तसेच राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे हा अग्रलेख लिहिला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्याच्यावर राजद्रोहाचा दोन खटले भरले. तसेच त्यांना दोषी ठरवून १८ महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

तुरुंगवास

Baal Ganga Dhar Tilak त्यानंतर लोकमान्य टिळकांवर सन १९०८ मध्ये राजद्रोहाचा खटला भरण्यात आला आणि सहा वर्षाची शिक्षा सुनावली. त्या काळात त्यांना ब्रह्मदेशातील मंडाले या तुरुंगात ठेवण्यात आले.

हा तुरुंगवास भोगत असताना त्यांनी ‘गीतारहस्य’ नावाचा ग्रंथ लिहिला. तसेच ‘ओरायन’, ‘द आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ हे महत्तवपूर्ण ग्रंथ लिहिले.

लोकमान्य टिळकांचा मृत्यू

bal ganga dhar tilak e1572671165147 लोकमान्य टिळक यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आणि संघर्ष करून भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महान कार्य केले आहेत. लोकमान्य टिळक जो पर्यंत जिवंत होते तोपर्यंत त्यांनी आपल्या भारत देश स्वतंत्र करण्यासाठी लढाई सुरु ठेवली. पण १ ऑगस्ट, १९२० साली भारतातील एका ‘तेजस्वी सूर्याचा’ असत झाला.

निष्कर्ष:

लोकमान्य टिळक हे एक महान देशभक्त होते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यास एक नवीन चालना दिली. त्यांनी दिलेली घोषणा ही भारतीयांसाठी एक घोषणा आणि स्वाभिमानाची प्रेरणा आहे.

लोकमान्य टिळकांनी केलेल्या महान कार्यामुळे त्यांचे नाव हे भारताच्या इतिहासावर अजरामर आहे. असे हे थोर व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभले याचा आम्हा सर्व भारतीयांना अभिमान आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *