भगतसिंग मराठी निबंध – वाचा येथे Essay on Bhagat Singh in Marathi

प्रस्तावना:

या भारतभूमीवर अनेक महान नेत्यांचा, वीरांचा जन्म झाला आहे. या सर्व नेत्यांनी तसेच स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशातही आणि समाजासाठी कार्य करताना आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे.

अशाच महान वीरांपैकी एक अमर क्रांतिकारी वीर होते ते म्हणजे शहीद भगतसिंग. ज्यांनी भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हसता – हसता आपल्या बलिदानाचा त्याग केला आहे. शहीद

जन्म

Bhagat Singh

शहीद भगतसिंग यांचा जन्म २७ सप्टेंबर, १९०७ साली पंजाब मधील लयालपूर जिल्ह्यातील बंगा या गावी एका शीख कुटुंबात झाला.

त्यांच्या आईचे नाव विद्यावती कौर आणि वडिलांचे नाव किशन सिंग असे होते. त्यांचे वडील सरदार किशन सिंग आणि काका स्वारण सिंग हे दोघे सुद्धा देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारे स्वतंत्रता सैनिक होते.

भगतसिंग यांच्या जन्मानंतर त्यांच्या आजीने त्यांचे नाव ‘भागो वाला’ असे ठेवले. ज्याचा अर्थ होतो – चांगले नशिबवाला. त्यानंतर ते भगतसिंग या नावाने ओळखले जाऊ लागले.

शिक्षण

23 bhagat singh6

भगतसिंग हे लहानपणापासून हुशार होते. ते लहान असतानाच वीरांचे खेळ खेळत असत. त्यांच्या मनामध्ये लहानपणापासून देशप्रेमाची भावना भरलेली होती.

भगतसिंगने आपले प्राथमिक शिक्षण आपल्या गावातच पूर्ण केले. त्यांनी आपल्या वयाच्या १४ व्या वर्षांपासून पंजाबमधील क्रांतिकारक संस्थांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी डी. ए. व्ही शाळेतून नववीची परीक्षा दिली.

भगतसिंग कॉलेज मध्ये शिकत असताना त्यांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करण्याची शपथ घेतली.

लाला लजपत राय यांची हत्या

lala lajpat rai 18 1502702528 246154 khaskhabar

१३ एप्रिल, १९१९ साली झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडामुळे त्यांच्या जीवनावर सर्वात जास्त परिणाम झाला.सायमन कमिशनचा विरोध करणाऱ्या लाला लजपत राय यांच्यावर इंग्रजांनी केलेल्या लाठीमारामुळे ते जखमी झाले.

जालियनवाला बाग हत्याकांड नंतर लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. यामुळे भगतसिंग यांना मोठा धक्का बसला. म्हणून भागात सिंग यांना ब्रिटिश सरकारचा राग आला आणि त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे ठरविले. हा बदला पूर्ण करण्यासाठी त्यांना सर्वात प्रथम सॉन्डर्सचा मारायचे होते.

त्यानंतर भागात सिंग आणि राजगुरू या दोघांनी सॉन्डर्सवर धडक घातली. तसेच चंद्रशेखर आझाद यांनी त्यांना मदत केली. यांनी सॉन्डर्सला मारल्यानंतर विधान सभेच्या संसद भावणार बॉम्ब फेकला. त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य

bhagat singh sukhdev rajguru

भारत देशाच्या आजादीसाठी भगत सिंग यांनी ब्रिटिश सरकारशी शक्तिशाली लढा दिला. त्यांनी ब्रिटिश सरकारशी लढा देण्यासाठी अशा लोकांमध्ये सामील झाले ज्यांची शैली गांधीवादी नव्हती. त्यांनी युरोपियन क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास केला आणि ते साम्यवादाकडे गेले.

त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना समाजवादी आणि साम्यवाद म्हणून ओळखले जाते. भारत देशाला आजादी मिळवून देण्यासाठी त्यांनी महान कार्य केले आहे.

भगत सिंग यांचा मृत्यू

30 03 2018 bhagat

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भगतसिंग, राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद यांनी तिघांनी क्रांतिकारी लढा दिला आहे. यामुळे या तिघांना अटक करण्यात आली.

२३ मार्च, १९३१ साली भगत सिंग, राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद या तिघांना फाशीची शिक्षा देण्यात आली. या तिघांना फाशी दिल्यावर ब्रिटिश सरकारला भीती वाटू लागली की, जर हे भारतीयांना समजलं जर संपूर्ण देशात आंदोलन सुरु होतील.

निष्कर्ष:

भागात सिंग हे खरे देशभक्त होते. ज्यांनी आपल्या देशाला वाचविण्यासाठी खूप संघर्ष केला आणि आपल्या वयाच्या २२ व्या वर्षी आनंदाने फाशीची शिक्षा स्वीकारली.

भगत सिंग हे आजच्या पिढीतील तरुणांसाठी एक सर्वात मोठा आदर्श आहे. त्यामुले त्यांचे नाव हे शहीद झालेल्या वीरांमध्ये सर्वात प्रथम घेतले जाते.

मराठीत भगतसिंग निबंधाविषयी काही शंका असल्यास आपण खाली आपली प्रतिक्रिया देऊ शकता.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *