दिवाळी पर निबंध – पढ़े यहाँ Diwali Essay in Marathi

भारत देश हा उत्सवांचा सण आहे. भारत देशात वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी दिवाळी हा सण भारत देशात साजरा केल्या जाणाऱ्या सणांपैकी सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा सण आहे.

हा सण भारतामध्ये सगळ्या धर्माचे लोक मोठ्या आनंदात साजरे करतात. दिवाळी या सणाला दिपावली पण म्हटले जाते. दिवाळी हा सण भारत देशा बरोबर दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियातील सर्व धर्माच्या लोकांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

दिवाळी सण केव्हा साजरा केला जातो –

आमच्या भारत देशामध्ये दिवाळी हा सण हिंदू महिना आश्विन महिन्याच्या शेवटी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्या मध्ये साजरा केला जातो. दिवाळी सणाला सगळ्यांना सुट्टी असते.

असे म्हटले जाते कि, दिवाळी हा सण प्रकाशाचा, रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, आपुलकीचा और मैत्रीचा भरलेला सण आहे |

दिवाळी सण का साजरा केला जातो –

दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो, ज्या दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध करून माता सीता हिला आपल्या अयोध्या नगरीमध्ये परत आणले होते.

म्हणून सगळ्या अयोध्याच्या लोकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी  तुपाचे दिपक लावून मोठ्या आनंदात हा सण साजरा केला होता. भगवान श्रीरामांचे स्वागत करणे सर्वात महत्वाचे होते कारण, त्यांनी १४ वर्षाचा वनवास भोगून आपल्या स्वराज्यात प्रवेश केला होता.

म्हणून हा दिवस अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दिप मांगल्याचा प्रतिक मानला जातो. या सणाच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधार दूर व्हावा म्हणून दिवाळी हा सण साजरा केला जातो.

दिवाळी सण

दिवाळी सणाला घराच्या मुख्य प्रवेशाच्या दरवाजावर आम्र पानाचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते.

अंगणात मुख्य प्रवेश दरवाजा समोर रंग – बिरंगी रंगाच्या रांगोळ्या काढल्या जातात. हिंदू धर्मामध्ये रांगोळीला शुभ मानले जाते. त्याच बरोबर घराच्या चारही बाजूंना तेलाचे दिपक एका रांगेत ठेवून घर सुशोभित केले जाते.

दिवाळीच्या आदल्या दिवशी काही लोक नवीन वस्तू खरेदी करतात. भारत देशामध्ये हा सण अन्य धर्माचे लोक आपल्या – आपल्या रिती – रिवाज आणि परंपरेनुसार साजरा करतात.

दिवाळी पांच दिवसांचा सण

दिवाळी हा पांच दिवसांपर्यंत चालणारा सण आहे. सगळे लोक दोन आठवड्या पूर्वीच दिवाळीच तयारी सुरु करतात.

धनतेरस

दिवाळीचा पहिला दिवस धनतेरसच्या रूपाने साजरा केला जातो. या दिवशी लोक नवीन वस्तू या सोने – चांदी खरेदी करणे शुभ मानतात. या दिवशी घर दिव्यांनी सजवले जाते.

धनतेरस दिवशी धनाची देवी धन्वंतरीची पूजा केली जाते आणि अभिषेक केला जातो. हा दिवस धन्वंतरी देवीचा जन्म दिवस पण मनाला जातो.

नरक चतुर्थी 

नरक चतुर्थी हा दिवस छोटी दिवाळीच्या रूपाने साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्ण ने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. या दिवशी पहाटे लवकर उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करून देवीची पूजा केली जाते.

मोठी दिवाळी – लक्ष्मीपूजन

हा दिवस दिवाळीच्या पांच दिवसांपैकी सर्वात महत्वाचा दिवस आहे. या दिवशी रीती -रिवाज और परंपरेनुसार माता लक्ष्मी, भगवान श्रीगणेश और देवी सरस्वती यांची पूजा केली जाते.

या दिवशी लहान – थोर मूल और मोठी लोक पटाखे फोडून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात.

पाडवा

दिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याच्या रूपाने साजरा केला जातो. या दिवशी बरेच काही लोक भगवान श्रीकृष्णाची गोवर्धन पूजा करतात. या दिवशी ग्रामीण भागातील गाय, बैल आणि म्हशी यांची पूजा करतात.

भाऊबीज

दिवाळीचा पांचवा दिवस हा भाऊबीजच्या रूपाने साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या समृद्धी आणि भरभराटीसाठी शुभकामना करतात.

भाऊ आपल्या बहिणीला छानशी भेटवस्तू देऊन खुश करतात. हा दिवस रक्षाबंधन एवढाच पवित्र मानला जातो.

निष्कर्ष:

दिवाळी हा रभाताच्या सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक प्रकाशाचा आणि महत्वाचा सण आहे. हा सण संपूर्ण भारतात विविध धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

For any other query regarding the TS ICET 2020 Entrance Exam, you can ask us by leaving your comment below.

Updated: नवम्बर 5, 2019 — 6:10 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *